Posts

Showing posts from June, 2019

औरंगजेब:- तंबूंचे तणावे कापू

Image
#ऐतिहासिक_माहिती मराठ्यांच्या स्वातंत्र्यसमराच्या काळात राजाराम महाराजांनी अनेक हाल अपेष्टांचा सामना करत जिंजीचा किल्ला गाठला. त्यानंतर मुघलांच्या वतीने झुल्फिकारखानाने जिंजीच्या किल्ल्यास वेढा टाकला. या वेढ्याच्या वेळी, मराठे व झुल्फिकारखान यांचे सूत जुळले होते असे दिसते. मराठ्यांची होणारी ये-जा, पोहोचणारी रसद यात मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत नव्हते. औरंगजेबासही याचा सुगावा लागलाच होता. नोव्हेंबर १६९२- जिंजीच्या छावणीतून आलेली बातमी, मोगलांचे हल्ले जिंजीवर चालू आहेत, पण किल्ला त्यांचे हाती पडण्याचे लक्षण दिसत नाही. दक्षिणेतून जिंजीच्या बचावास भराभर फौजा येत असल्याची बातमी आहे. मोगलांच्या लष्करावर आतील(किल्ल्यातील) मराठे छापे घालतात, ते यशस्वी होतात. राजाराम व झुल्फिकारखान यांचे अंतस्थ सूत आहे, असा बाहेर जो बोभाटा चालतो त्यास पोषक अशाच गोष्टी दिसून येतात. झुल्फिकारखानाचे वकील खुशाल राजारामाकडे जात-येत असतात. उभयतांच्या वाटाघाटी चालतात. या वाटाघाटी काही गुप्त काही राजरोस घडत आहेत. बादशहाकडून झुल्फिकारखानास वारंवार ताकिदी व ठपके येत आहेत. तुम्ही ताबडतोब जिंजीचा किल्ला ...

शनिवारची नौबत

Image
         मराठी राज्यात दुफळी निर्माण करण्याच्या दृष्टीकोनतून शाहू महाराजांची मोगली कैदेतून सुटका करण्यात आली. शाहू महाराजांनी महाराष्ट्राच्या दिशेने प्रयाण केल्यानंतर अनेक मोठमोठ्या लोकांचा त्यांस पाठिंबा मिळाला. शाहू राजांनी धैर्य, तडफ, निश्चय, मुत्सद्देगिरी इ. गुण प्रकट केले की, त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र मोठा आदर उत्पन्न झाला. याचमुळे ताराबाईंचे मनोरथ ढिले पडले. नगर मुक्कामी राहून शाहू महाराजांनी आपला जम बसविला आणि ताराबाईंच्या फौजा चालून येतात असे कळताच सप्टेंबर(१७०७) अखेर दसऱ्याचे मुहूर्तावर शाहू राजांनी नगरहून पुढे प्रयाण करून खेडवर मुक्काम केला. नदीपलीकडे कडूस येथे धनाजी जाधव, परशुराम त्रिंबक इ. ताराबाईंचे सरदार लढाईस सज्ज होऊन राहिले. आश्विन शुद्ध पक्षात बहुधा धनत्रयोदशी म्हणजे ता. १२ ऑक्टोबरचे सुमारास खेड येथे लढाई होऊन शाहू राजांस विजय मिळाला. खेडच्या लढाईच्या पूर्वी शाहू राजांनी भेद करून, ताराबाईंच्या पक्षातील लोकांची मने आपल्या बाजूस वळविण्याचे काम केले होते. खेडच्या लढाईचा रंग ओळखून परशुरामपंत प्रतिनिधी पळून गेल्याने हस्तग...