Posts

Showing posts from March, 2017

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

Image
३ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वरास संभाजी राजांना कैद करण्यात आले.त्यानंतर राजारामाला मराठ्यांचा राजा म्हणून जाहीर करण्यात आले. येसूबाईनी या गोष्टीस संमती दिली. येसूबाईंना राजारामाविषयी आस्था होती, तसेच राजारामास शाहूबद्दल प्रेम होते. संभाजीराजे पकडले जाण्यापूर्वी रायगडाभोवती मोगली सैन्य जमा झाले होते. औरंगजेबाने एतिकादखान(झुल्फिकारखान) याला रायगडाच्या वेढ्याच्या कामास पाठविले होते. २५ मार्च १६८९ रोजी त्याने रायगडास वेढा घातला. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी राजांचे समर्पण झाले. पतीनिधनाचे दुखः कोसळले असताना येसूबाईंनी जी धीरोदात्तता दाखविली, त्यास मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही. मुघलांचा वेढा कडक होत असताना सर्व परिवार हाती लागू नये म्हणून,येसूबाईंनी सल्ला दिला.  'मुलाचे(शाहू) वय लहान,राज्य तरी गेलेचं,त्या अर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार शूर याणी एक विचारे होऊन, राजारामसाहेब यास घेऊन बाहेर पडावे. मुलास बाहेर जाऊन राहणे यास जवळ जागा रायगडाहून बांकी ऐशी दुसरी नाहीच. अर्थी मुलास व आम्हांस येथील बंदोबस्त करून येथे ठेवावे. तुम्ही सर्वांनी राजारामसाहेबांसहवर्तमान बाहेर पडून, फौजा ज...

बलकुबल औरंगजेब

Image
दक्षिणेत मराठ्यांच्या मुळावर आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी त्राहीभगवान करून सोडले होते.मराठ्यांनी इतकी लांडगेतोड केली होती की,मुघल अक्षरशः हताश झाले होते.मराठ्यांचे राजकुटुंब हाती सापडूनसुद्धा ताराबाईसारख्या रणरागिणीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या सळसळत्या समशेरींनी त्याची झोप उडवली.औरंगजेबास जराजर्जर अवस्था प्राप्त झाली आणि तो वैफल्याच्या वाटेने जाऊ लागला. १७०५-६ च्या सुमारास औरंगजेब पूर्ण हताश झाला होता.त्याला मराठी सैन्य किड्यामुंग्याप्रमाणे सर्व बाजूनी कुरतडत असल्याची जाणीव झाली होती.औरंगजेबाची घमेंड उतरवणारे हे पुढील पत्र आहे,त्यात त्याचा निश्चय किती डळमळला होता हे दिसते.सदर पत्र हे १७०५-६ च्या सुमारास बादशहाच्या आज्ञेने फिरोजजंगाला(निजाम-उल-मुल्क याचा बाप) लिहिले आहे. "बादशहाच्या आज्ञेप्रमाणे मी (इनायततुल्लाखान) कळवीत आहे की, दख्खनच्या सुभेदाराकडून नरकवासी शिवाजी व त्याचा मुलगा यांचे व इतर बंडखोरांचे पारिपत्य झाले नाही.पंचवीस वर्षापूर्वी आम्ही सैन्यासह अजमीरहून निघालो आणि दक्षिणेत तळ दिला.परमेश्वराच्या मार्गानेच चालण्याची आमची नियत होती.या पंचवीस वर्षांच्या काळात परमेश...