Posts

Showing posts from April, 2017

**अकबर व इतर धर्म**

Image
इस्लामच्या पायाभूत तत्वांबाबत त्यांच्या धर्म पंडितांमध्ये असलेले मतभेद व त्यांच्या आपसातील असलेल्या भांडणांमुळे अकबर वैतागला आणि सत्य जाणून घेण्यासाठी त्याने इतर धर्मांच्या विद्वानांना इ.स.१५७८ च्या शेवटला इबादतखान्यात चर्चेला पाचारण केले.अबुल फझल म्हणतो,"The Imperial Court became the home of piligrims of the seven worlds and the scholars of various religious sects." १) अकबर व झोरोस्ट्रीयन्स:-  झोरोस्ट्रीयन उर्फ पारशी धर्माचा विद्वान धर्मगुरू नवसारीचा दस्तूर मेहरजी राणा याच्याशी अकबराची इ.स.१५७३ मध्ये प्रथम भेट झाली होती. इ.स.१५७८ अकबराने दस्तूर राणाला इबादतखान्यात पाचारण केले.त्याच्या संपर्कामुळे अकबरावर पारशी धर्माचा बराच प्रभाव पडला व अकबराने पारशी धर्माच्या काही तत्वांचा स्वीकारही केला.त्याने दस्तूर राणाला २०० बिघे जमीन इनाम म्हणून दिली.पारशी धर्माच्या प्रभावामुळे अकबराने त्याच्या महालात अखंड अग्निप्रज्वलन प्रथा सुरु केली,अशा रीतीने अकबराने सूर्य,अग्नि,प्रकाश या देवतांविषयी पूज्यभाव बाळगला. २) अकबर आणि जैनधर्म:- अकबराचा जैन धर्माशी संपर्क इ.स.१५५८ मध्येच आला.इ...

**प्रेमाचा मामला औरंगजेब गुंगला**

Image
आलमगीर औरंगजेब म्हणजे क्रुरता,कपट,धर्मांधता,अत्याचार,आबिद(परमेश्वराचा भक्त) ह्या सगळ्यांचा पुतळाच होय.औरंगजेब हा त्याची आई मुमताजमहल हिचे सहावे अपत्य होय.त्याचा जन्म २४ ऑक्टोबर १६१८ रोजी झाला.तो लहानपणापासून अत्यंत साहसी,बुद्धिमान,महत्वकांक्षी असल्याने १६३४ मध्येच दहा हजाराचा मनसबदार झाला.दक्खनच्या सुभ्याचा सुभेदार म्हणून त्याने दोन वेळा काम पाहिले.शाहजहान बादशहाने त्याला जेव्हा इ.स.१६५२ मध्ये दक्खनच्या सुभ्यावर सुभेदार म्हणून नेमले  तेव्हापासूनच औरंगजेबाने दिल्लीचे शाहीतख्त कसे मिळवता येईल यासाठी आपली बहीण रोशनआराच्या मदतीने प्रयत्न सुरु केले.इ.स. १६५२ मध्ये औरंगजेब दिल्लीहून औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघाला तेव्हा वाटेत त्याने बुऱ्हाणपूरला मुक्काम केला.हा मुक्काम बहुधा त्याच्या आयुष्यातला यादगार मुक्काम असावा. येथेच औरंगजेबाच्या आयुष्याची दुसरी बाजू समोर येते.त्याने त्याच्या आयुष्यात घालवलेले गुलाबी दिवस असे त्यास म्हणता येईल.गुलाबी दिवस म्हणजे धर्मनिष्ठ औरंगजेबाचे प्रेमप्रकरण! ह्या प्रेमप्रकरणा आधी औरंगजेबाची तीन लग्ने झालेली होती.पण शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असत........