Posts

Showing posts from December, 2016

रतनपूरची लढाई भाग १

Image
मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचे पराक्रम चिरस्मरणीय ठरले आहेत.आपल्या पराक्रमाने त्यांनी मोगलांच्या मनात खूप मोठी दहशत निर्माण केली.संताजीच्या मृत्यूनंतर मोगलांविरुद्ध चाललेला लढा यशस्वीपणे शेवटास नेण्याचे श्रेय धनाजी जाधवाचे होय.इ.स.१६९७ पासून १७०७ पर्यंत धनाजीने मुघलांना सळो की पळो करून सोडले.या काळातच मराठ्यांनी माळवा व गुजरात या सुभ्यांवर आक्रमणे केली.गुजरातेवरील आक्रमणाचे नेतृत्व धनाजीकडे होते.रतनपूरची लढाई ही मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्वाची घटना होय.४ मार्च १७०६ रोजी धनाजी जाधवाने रतनपूरच्या लढाईत मोगलांचा पराभव केला.या युद्धानंतर मराठ्यांना गुजरातचे दार मोकळे झाले.यानंतर पन्नास वर्षे गुजरातेत सतत युद्धे करून मराठ्यांनी गुजरातेतून मोगलांना नाहीसे केले,आणि तो प्रांत त्यांनी आपल्या ताब्यात आणला.इ.स.१७०१ पासून १७०५ च्या अखेरपर्यंत औरंगजेबाचा मुलगा शहजादा आझम हा गुजरातचा सुभेदार होता.गुजरातेहून आपली बदली करण्यात यावी अशी त्याने औरंगजेबाला विनंती केली.त्याप्रमाणे औरंगजेबाने काश्मीरचा सुभेदार इब्राहीमखान याची गुजरातेवर नेमणूक केली.तो येऊन रुजू ह...

मुस्लीम राज्यकर्त्यांची ध्येय-धोरणे व धर्मांधपणा

Image
भारतात मुसलमानी सत्ता स्थापन झाल्यावर ती धर्माने,संस्कृतीने,भाषेने,तत्त्वज्ञानाने व इतर अनेक प्रकारे भिन्न असल्यामुळे त्या सत्तेचा येथील समाजावर विविध प्रकारचा परिणाम होणे अपरिहार्य होते.मुसलमानी सत्ताधारी धर्माने इस्लामी होते,तर शाशित प्रजा धर्माने हिंदू होती. 'सर्व धर्माची मूलतत्वे एकच आहेत.' हे विधान सांगण्यास व ऐकण्यास   गोड असले तरी ते अतिशय भोंगळ व सत्याचा अपलाप करणारे आहे.एका पद्यात म्हटल्याप्रमाणे 'धरम धरम मे भेद रहत हे' हे विधान अधिक सत्याधीष्ठीत आहे.मुसलमानी राज्यकर्त्यांची आधारभूत तत्वे ही हिंदू तत्वाहून अगदी निराळी होती.येथील समाज सामान्यतः ईश्वरवादी असला तरी,त्याच्या ईश्वरविषयी तत्वज्ञानात पुष्कळ पंथोपंथ होते;एवढेच नव्हे,तर पाखंडी किंवा नास्तिक लोकही त्या समाजात विशेष त्रास न होता राहू शकत.येथे नव्याने आलेले मुसलमान राज्यकर्तेही ईश्वरवादी होते,पण त्यांच्या ईश्वर व धर्मविषयक कल्पनांच्या विरुद्ध जे असेल ती सर्व नास्तिकता व तिचा आचार करणारे ते सर्व काफीर,एवढेच नव्हे तर अशा नास्तिकांना सर्व तऱ्हेने चोपून काढून त्यांचा नाश करणे किंवा त्यांना आपल्या धर्मात आणणे,...

शिवाजी महाराजांचे आरमार

Image
(सदर Article मध्ये आरमार कसे होते? त्याची गरज का होती? आणि महाराजांचे आरमाराबद्दलचे धोरण याबद्दल लिहिले आहे.मराठी आरमारी लढाया यांवर लिहिलेले नाही त्यावर एक वेगळे Article होऊ शकेल.)   शिवाजी महाराज १२-१३ वर्षांचे असताना म्हणजे १६४२-४३ मध्ये त्यांची रवानगी पुण्याला वडिलांच्या जहागिरीवर करण्यात आली.पुण्यात आल्यावर त्यांनी मावळ व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला.आदिलशाहीच्या जहागिरीत राहून येथील किल्ले जिंकून सत्तेची पाळेमुळे रोवली.राजगड,रोहिडा,तोरणा,कुवारगड,कोंढाणा इत्यादी किल्ले ताब्यात आणले. इ.१६५५-५६ मध्ये जावळी सर केल्यावर रायगड किल्ला स्वराज्यात आला आणि स्वराज्याची हद्द समुद्राला जाऊन भिडली,तेव्हा स्वराज्याचा संबंध सिद्दी,इंग्रज,पोर्तुगीज,डच,फेंच या सत्तांशी आला.(आजचा मुंबईतील कुलाबा हा प्रदेश सिद्दीच्या अमलाखाली होता.)सिद्द्यांची राजधानी दंडराजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर होती.किनारपट्टीवर धाडी घालणे,लुट करणे,जाळपोळ करणे,बायका पळवणे,लोक बाटवणे हा सिद्द्यांचा जुना धंदा होता.या सगळ्याची दखल शिवाजी महाराजांनी घेतली होती. पुढे १६५७ मध्ये महाराजांनी कल्याण,भिवंडी पावेतो प्रदेश...