समस्त जातीनी धर्म अनादी चालत आले त्याप्रमाणे चालावे
शिवाजी महाराज हे वर्णाश्रमधर्माचे पुरस्कर्ते होते.शिवपूर्वकाळापासून झालेला यवनांचा सुळसुळाट, त्यांचे राज्य व सेवा तसेच संपर्कामुळे वर्णाश्रमव्यवस्थेतील प्रत्येक जातीचे आचार धार्मिक दृष्ट्या दूषित झाले होते.म्हणून त्यांनी सर्व जातींना उद्देशून वरील आज्ञापत्र जाहीर केले.ज्ञातीविवेक व स्कंद पुराणांतर्गत सह्याद्रीखंड व इतर मान्यताप्राप्त स्मृतीग्रंथात प्रत्येक जातीचे आचारनियम दिले आहेत त्यानुसार त्या जातीने वागावे म्हणजे समाजातील आचारसंकट दूर होईल, असे महाराजांनी आज्ञापत्रात म्हटले आहे.
--------------------------------------------
--------------------------------------------
श.१५९८, माघ. शु. ५
सु. १०७७, जिल्हेज ४
इ.स. १६७७, जाने. २८
मुद्रा
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३ नलनाम संवत्सरे माघ शुक्ल ५ क्षेत्रीये कुलावतंस श्री राजा सिवाजी छत्रपती स्वामी याणी समस्त ब्राह्मण वेदपाटी व ग्रहस्थान व क्षेत्रिय मंडली तथा प्रभु ग्रहस्थान व वैश्य ज्ञाती व सुद्रादी लोकान तथा जमेदार व वतनदार व रयेत वगैरे सर्व ज्ञाती हिंदु महाराष्ट्रात तथा महालानि व देश तालुके व प्रांतनिहाय वगैरे यास आज्ञा केली ऐसीजे. हिंदु ज्ञातीत आनादी परंपरागत धर्मशास्त्राप्रमाणे धर्म चालत आले असता अलीकडे काही दिवसात येवनी आमल जाहल्यामुळे काही ज्ञातीतील लोकास बलात्कारे धरून भ्रष्ट केले व कितेक जागीची दैवते जबरीने छिन्नभिन्न केली. हिंदु ज्ञातीत आहाकार जाहला. गायब्राह्मणसह धर्म उत्छ्द होण्याचा समय प्राप्त जाहला. त्याजवरून श्री ईश्वरी कृपेने आमचे हाते श्री सांबजीने यवन वगैरे दुष्टास शासन करऊन पराभवाते गेले व राहिले ते शत्रू पादाक्रात होतील परंतु लिहिण्याचे कारण की या सरकारात राज्याभिषेक समई क्षेत्रक्षेत्रादि क्षेत्रस्थ ब्राह्मण बहुत ग्रंथ अनादि सर्व जमा करून धर्मस्थापना जाहली त्यात श्री कासी क्षेत्रस्थ सिष्ट ब्राह्मणांत काही तड पडून हाली ग्रंथ पाहता भटजीकडून तफावत जाहली आहे. ठरले त्याजवरून हली पुन्हा शास्त्री पंडित व मुदसदी व कारकून यांस आज्ञा होऊन ज्ञातीविवेक व स्कंद पुरणांतरगत श्याद्रिखंड अदी माहन ग्रंथी निरणय सर्व ज्ञातीविसी जाहले आहे ते वगैरे सर्व ग्रंथानुमते व जसे ज्याचे धर्म अनादी चालत आले त्याप्रमाणे निरवेध चालावे अगर ज्या ज्या ज्ञातीस वेदकर्माचा अधिकार असून येवनी जाहल्यामुळे आथवा ब्राह्मणानी काही द्वेषबुध्धीने शास्त्रांनरूप कर्मे न चालावता मलीन जाहली असतील ती त्या ज्ञातीचे मंडलीनी पुरी पाहून ज्याची त्याणी नीट वहिवाट आचरणे. ज्या ज्ञातीत जसी परंपरा चालत आली त्या प्रो| चालवावी. जो कोणी द्वेषबुद्धीने द्रव्यलोभास्तव ब्राह्मण शास्त्रविरहित नवीन तंटे करून खलेल करील येविसी त्या ज्ञातीवले यानी सरकारात अर्ज करावा. म्हणजे शास्त्राचे समते व रूढीपरंपरा व ग्रंथ पाहून सरकारातून निरंतर निरमत्छरपणे धर्मस्थापना कोणाचा उजूर न धरिता परनिष्ट जेव्हांचे तेव्हाच त्वरित बंदोबस्त होत जाईल. हली येवन उतर देसीहून येत आहे. तरी सर्व ज्ञातीनी यकदिल राहून कस्त मेहनत करून सरकारची सेवा करून शत्रू पराभवाने न्यावा. यात कल्याण तुमचे सरकारचे ईश्वर करील. जाणिजे मार्यादेयं विराजते.
शब्दांचे अर्थ:-
शब्दांचे अर्थ:-
- उजूर:- आक्षेप, सबब
- खलेल:- गैर, तंटा
संदर्भ:-
मूळ संदर्भ:- ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास पृ. १५४-५५
दुय्यम संदर्भ:- मराठ्यांचा इतिहास: साधन-परिचय: अ.रा.कुलकर्णी
मूळ संदर्भ:- ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास पृ. १५४-५५
दुय्यम संदर्भ:- मराठ्यांचा इतिहास: साधन-परिचय: अ.रा.कुलकर्णी
Comments