**निग्रो बाजीराव**
ह्या काळी पोर्तुगीज लोक हिंदूस सामान्यतः 'जेंतीव' (अशिक्षित) किंवा 'नेग्रु' (काळा) अशा शब्दाने संबोधीत. वासुदेव जोशी यांनी बाजीरावांना लिहिलेल्या पत्रात लिहितात, 'फिरगियांनी लबाडी केली. पत्र पाठविले त्याचे उतर मगरूरपणे लिहिले याकरिता त्याला ठेचगा द्यावा म्हणून लिहिले. निदान दोन अडीच हजार माणूस व दीड हजार व दोन हजार स्वार सिद्ध करावे म्हणजे स्वामींचे प्रतापे कार्य सिद्धीस जाते.'
पुढे १७३९ सालात मराठ्यांनी वसई प्रांतातला पोर्तुगीज अंमल पूर्णपणे उठवला.
संदर्भ:- पोर्तुगीज-मराठे संबंध:- डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर
पेशवे दफ्तर खंड १६, ले. १४
#ऐतिहासिक_माहिती
संदर्भ:- पोर्तुगीज-मराठे संबंध:- डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर
पेशवे दफ्तर खंड १६, ले. १४
#ऐतिहासिक_माहिती
Comments