Posts

म्हाळोजी घोरपडे आणि हिंदू धर्म !

Image
घोरपडे घराण्याच्या इतिहासात म्हाळोजी हे एक शूर पुरुष होते. शौर्य, युद्धकौशल्य यात निपुण होते. तसेच ते निष्ठावान देखील होते. म्हाळोजी घोरपडे यांच्या कर्तबगारीसंबंधी बखरी व कैफियती यात अनेक गौरवपर उल्लेख सापडतात. घोरपडे व भोसले यांचे निकटचे संबंध होते. इतर मराठे सरदारांप्रमाणे म्हाळोजी देखील आदिलशाहीत नोकरी करीत होते. पण त्या दरबारात पक्षपाती वागणूक दिली जात. विशेषतः हिंदू धर्माच्या बाबतीत विजापूरचे बादशहा जुलमी वर्तन करतात याचा म्हाळोजींना प्रत्यक्ष अनुभव येत होता. आदिलशाहीत म्हाळोजी शहाजी राजेंबरोबर काम करत होते. पुढे त्यांनी शिवाजी महाराज व संभाजी राजांच्या कारकिर्दीत चांगली लष्करी कामगिरी केली. हिंदुराव(बहिर्जी) घोरपडे घराण्याच्या कैफियतीत म्हाळोजींसंबंधी दिलेल्या माहितीचा आशय पुढीलप्रमाणे:- 'म्हाळोजीराव घोरपडे आदिलशाही बादशहाच्या नोकरीत होते. त्यावेळी बादशहाने असा विचार केला की आपण या सलतनतीचे सर्वश्रेष्ठ सत्ताधीश असताना आपले मराठे सरदार हिंदू धर्माच्या पद्धती प्रमाणे आचरण करतात, ही गोष्ट अयोग्य आहे. आपला धर्म आणि हिंदू धर्म हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हा सर्व प्रदेश आपल्या ताब...

गोव्यातील एक समारंभ

Image
  वसई प्रांत हातातून गेल्यावर तर पोर्तुगीजांची आर्थिक घडी फारच बिघडली होती. परंतु ‘सुंभ जळाला पीळ न गेला’ ह्या न्यायाने त्या काळीसुद्धा पोर्तुगेजांचा हिंदुस्थानातील बडेजाव कमी झाला नव्हता ! मार्केज द ताव्ह्र्र ह्या विजरईच्या कारकीर्दीस सन १७५१ मध्ये सुरुवात झाली तेव्हा गोव्याचे उत्पन्न तेथील खर्चास देखील पुरेल इतके नव्हते. परंतु नवलाची गोष्ट म्हणजे गोव्यात त्या काळी देखील मोठमोठे सरकारी समारंभ होत असत. म्हणजे पोर्तुगेजांची अवस्था “घरात नाही दाणा अन मला(आम्हाला) बाजीराव म्हणा” अशी होती(त्यात पुनः बाजीरावांचं नाव घेतलं म्हणजे पोर्तुगीजांचं पित्त खवळायचं नाही का!) अशा समारंभांपैकी एक मोठा उत्सव पोर्तुगालचा राजा पहिला दों जुझे ( D . Joze I) हा गादीवर बसल्यावर गोवे शहरामध्ये सन १७५१ तील डिसेंबरात झाला. त्याचे समकालीन वर्णन उपलब्ध आहे. हा समारंभ एक आठवडा चालला होता ! त्या दिवसांत करण्यात आलेली गोवे शहरातील मांडवी नदीच्या तीरावरील अपूर्व रोषणाई पाहण्यासाठी खासा विजरई बोटींतून रात्री फिरत होता. हिंदू लोकांनीही ह्या उत्सवामध्ये पुष्कळ पैसा खर्च करून हिरीरीने भाग घेतला होता ! ह्या प्र...

मआसिर-ए-आलमगिरी, औरंगजेब, मंदिरे व इतर काही कृत्ये

Image
औरंगजेब आपल्याकडे औरंगजेब बादशाहा कसा सहिष्णू होता हे दाखविण्याचाचं प्रयत्न होत असतात. पण त्याच्या चरित्राचा ससंदर्भ अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आता आपण मआसिर-ए-आलमगिरी ( औरंगजेबाचे अधिकृत चरित्र) या ग्रंथात साकी मुस्तैदखानाने(हा औरंगजेबाच्या सेवेत होता) केलेल्या नोंदी पाहणार आहोत. ह्या नोंदी पाहून वाचकांनी काय ते ठरवावे, औरंगजेब धर्मनिरपेक्ष की अजून काही ! औरंगजेबाच्या आज्ञेने मंदिरं पाडली गेली त्याच्या नोंदी पुढीलप्रमाणे:- 1.      व चूं   हमगी हिम्मते हक़ तवियत ए   खिदेव ए दीनपरवर ए   शरीअतगुस्तर     मसरुफ ए तर्वीज़ ए   शराई   ए इस्लाम व तख़रीब ए   मरासिम ए काफ़र व ‌झिलाम अस्त ब-दिवानियान ए इजाम हुक्म ए क़ज़ाइमज़ा शरफ़ सुदूर याफ़्त अज़ घुर्रत ए माह मजकूर मुताबिक़ ए फ़रमान ए वाजिब   अलाजआन   ए "हत्ता युतु अल-जिज़याता अन यादिन व हम -     साघिरूना" व मुवाफ़िक़ ए रिवायत ए शरिया अज़ ज़िम्मियान ए   हुजूर व सुबाजात जिज़िया बगिरन्द ( 2 nd April 1679) ( मूळ फार्सी पाठ पृ. १७४) अर्थ:- आ...

**निग्रो बाजीराव**

Image
मराठे व पोर्तुगीज यांच्यात १७३० सालानंतर बरेच आमनेसामने झाले. पोर्तुगीजांस पेशव्यांशी युद्ध नको होते. कारण पोर्तुगीजांना मराठ्यांची दहशत वाटत असल्याचे उल्लेख आहेत. पोर्तुगीज व मराठे यांचे चौलच्या मशिदीजवळ २ जानेवारी १७३५ ला झुंज होण्यापूर्वी काही दिवस, बाजीरावांनी सन १७३२ च्या तहास अनुसरून कल्याण व भिवंडी येथील व्यापाऱ्यांसाठी वसईत एक वखार बांधण्यास वसईच्या 'जराल' कडे जागा मागितली होती. परंतु त्याने ति जागा तर दिली नाहीच, उलट खुद्द बाजीरावांस अनुलक्षून 'निग्रो' (Negro) असा अपमानास्पद शब्द वापरला ! ह्या काळी पोर्तुगीज लोक हिंदूस सामान्यतः 'जेंतीव' (अशिक्षित) किंवा 'नेग्रु' (काळा) अशा शब्दाने संबोधीत. वासुदेव जोशी यांनी बाजीरावांना लिहिलेल्या पत्रात लिहितात, 'फिरगियांनी लबाडी केली. पत्र पाठविले त्याचे उतर मगरूरपणे लिहिले याकरिता त्याला ठेचगा द्यावा म्हणून लिहिले. निदान दोन अडीच हजार माणूस व दीड हजार व दोन हजार स्वार सिद्ध करावे म्हणजे स्वामींचे प्रतापे कार्य सिद्धीस जाते.' पुढे १७३९ सालात मराठ्यांनी वसई प्रांतातला पोर्तुगीज अ...

सेनासाहेबसुभ्यासाठी भोसले बंधुंची भांडणे व देवाजीपंत चोरघडे यांची हुशारी

Image
#ऐतिहासिक_माहिती नागपूरकर सेनासाहेबसुभा रघूजी भोसले(थोरले) मरण पावले तेव्हा त्यांस चार पुत्र होते. जानोजी , मुधोजी, बिंबाजी व साबाजी. त्यातील जानोजी व बिंबाजी हे चांगले कर्ते होते. जानोजी व साबाजी हे धाकटे स्त्रीचे असून जानोजी हे चौघात वडील होते. मुधोजी व बिंबाजी हे वडील स्त्रीचे होते. रघूजींनी मरणापूर्वी , वडील पुत्र जानोजी यांनी सेनासाहेबसुभ्याचा मुख्य अधिकार चालवावा व बाकीच्या तिन्ही पुत्रांनाही राज्यात वाटणी देऊन त्याचा परामर्ष घ्यावा असे सांगितले होते.  रघूजींच्या मृत्यूवेळी जानोजी व साबाजी त्यांच्याजवळ होते. त्याचवेळेस मुधोजी यांस गाविलगडचा किल्ला सर करण्यास पाठविले होते. मुधोजी हे वडील बायकोचे सुपुत्र या नात्याने त्यांनी आपला वडीलपणा पुढे करून सेनासाहेबसुभ्याचे पद मिळविण्याचा विचार केला. जानोजी भोसल्यांनी देखील मुधोजींचे मन ओळखून आपली मजबुती करण्यास सुरुवात केली. मुधोजींनी मार्गातूनच जानोजीस पत्र लिहिले , ‘आम्ही वडील मातोश्रीचे. तेव्हा कनिष्ठ तुम्ही. दौलतीची मालकी आम्हांकडेस. तुम्ही आमचे आज्ञेत वागावे.’ याप्रमाणे लिहून मुधोजींनी वऱ्हाडातून खंडण्या घ...

नानांचे नाव

Image
नाना नावासंबंधी ही माहिती आहे. गोपिकाबाई नाना फडणविसांस 'फडणीसपंत' असे म्हणत असे. 'नाना' हे नाव नानासाहेब पेशव्यांचे असल्यामुळे त्याचा उच्चार गोपिकाबाई करीत नसत. ह्यासंबंधी हरिपंत फडके यांचे एक पत्र आहे. "विद्यापना. मातुश्रींचे(गोपिकाबाईंची) दर्शन झाल्यावर फडणीसपंत काय करितात अशी गोष्ट प्रथम निघाली. तेव्हा मनात आले की, नाना का म्हणत नाही? फडणीसपंत का म्हणतात? तेव्हा तेथील माहितगारीने मनास आणितां, नाना म्हणत नाही, व मजला एक वेळ स्वामींनीही गोष्ट सांगितली होती की, फडणीसपंत म्हणत असतात. 'नाना' म्हणजे नानासाहेबांचे नाव ते घेत नाही, असे सांगितले. त्यावरून संशय गेला. नाहीतर फडणीसपंत कुन्ह्याने म्हणतात असे वाटत होते. मौजेची गोष्ट मनात आली ती लिहिली असे. र|| छ. २९ माहे साबान हे विद्यापना" #ऐतिहासिक_माहिती संदर्भ:- इतिहाससंग्रह - तुषार माने

मिस जेम्स हॉल उर्फ जमालखान

Image
हिंदुस्थानात पुरुष सैनिकांबरोबर स्त्रियांच्याही पलटणी होत्या. अशाच एका जेम्स हॉल नावाच्या स्त्रीचा उल्लेख उत्तर पेशवाईत सापडतो. ह्या बाई लष्करी कवायतीत निष्णात होत्या. मूळच्या फ्लोरेन्सच्या असणाऱ्या ह्या बाईंचा हिंदुस्थानाशी संबंध आला. मिस्टर जेम्स हॉल नावाचे गृहस्थ मद्रास येथे होते , त्यांच्याशी या बाईंचा विवाह झाला होता. पण काही कारणांमुळे नवऱ्याशी फारकत घेऊन या बाईनी शिपाईगिरीचा पेशा स्वीकारला होता. त्या स्त्री पलटणी तयार करीत असत. त्यांच्या लष्करी पेशावरून त्यांना जमालखान असे नाव मिळाले(बहुधा आपल्या लोकांनी नावाचा चुकीचा उच्चार केला असावा.) ह्या बाई १७८८ साली सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत पुण्यात आल्या. इथे त्यांनी एक स्त्रीपलटण उभारली. बाईंचा स्वभाव बराच कडक होता. त्या मोगली सरदारांप्रमाणे मर्दानी पोषाख करून सेनानायकाचे काम करीत. त्यांच्या सेवेत एक ब्राह्मण नोकर होता व त्याच्याकडून काही अपराध घडल्यामुळे बाईनी त्यास मरेपर्यंत चोप दिला. ह्या प्रसंगामुळे नाना फडणीसांनी ह्या बाईंस लोहगडावर कैदेत ठेविले होते. तिथे त्या सात वर्ष कैदेत होत्या. पुढे शिंद्यांचा फ्रें...