Posts

Showing posts from November, 2016

रोपट्याचे वटवृक्ष !!

Image
भारताच्या आणि विशेषतः दक्खन देशाच्या इतिहासात सतरावे शतक हे फार महत्त्वाचे आहे. चैतन्यहीन बनलेल्या आणि संपूर्णपणे परकीयांच्या हुकुमतीखाली नांदणाऱ्या या खंडप्राय देशाला स्वत्वाची जाणीव करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम हे मराठ्यांनी केले. "याच मराठी सत्तेने मुघल साम्राज्य खिळखिळे करून दिल्लीच्या तख्ताचे नियंत्रण आपल्याकडे घेतले." याचे कारण शिवाजी महाराजांनी आरंभिलेला स्वराज्याचा उद्योग हे होय. शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता, तर या देशाचे काय झाले असते, या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. पण भारतीय इतिहासाचा पुढील क्रम पाहता असे वाटते की भारत स्वत्वाला पारखा झाला असता. स्वराज्य ही काय चीज आहे याची त्याला कल्पनाही आली नसती. स्वराज्याचा उद्योग हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. स्वराज्याचे कार्य हे आपले कार्य आहे, या भावनेने प्रेरित होऊन जेव्हा माणसे या कामाला वाहून घेतात, तेव्हाच स्वराज्याचे स्वप्न साकार होते. शिवाजी महाराजांनी अगदी लहानपानापासून हा उद्योग सुरु ठेवला. १६४५ साली म्हणजे वयाच्या केवळ १५ व्या वर्षी रोहिडखोऱ्याच्या देशमुखाला धीर देउन आपल्या उद्योगात सामील...

थोरले शाहूमहाराजांचे अधिकाऱ्यास पत्र

Image
हे खालील पत्र थोरले शाहू महाराज यांनी तर्फ कळंबे येथील अधिकाऱ्यास लिहिले आहे. दंग्यांमुळे हैराण झालेल्या रयतेची मनधरणी राजांनी केलेली आहे. शिवाजी राजांप्रमाणेच थोरल्या शाहू महाराजांनीदेखील रयत ही पोटच्या पोराप्रमाणेच मानली आहे हे दिसून येते. संदर्भ:- महाराष्ट्राचा पत्ररुप इतिहास

गनिमी काव्याचे PhD Holder मराठे !!

Image
स्वातंत्र्ययुध्दाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मराठ्यांची युध्दपध्दती. मराठ्यांचा गनिमी कावा मोगलांना कधीच समजला नाही आणि म्हणून मराठे जेव्हा हल्ला करून निघून जात, त्यावेळी त्यांचा पराभव झाल्याचे मोगल सेनानी बादशहाला कळवीत. आपल्या हालचालींविषयी कमालीची गुप्तता राखणे, शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवणे, शत्रूवर अचानक हल्ला करून जेवढे होईल तेवढे नुकसान करून त्वरेने प रत फिरणे, आपले बहुसंख्य लष्कर बिकट जागी लपवून ठेवून कमी संख्येने शत्रूवर हल्ला करून आपला पाठलाग करावयास लावणे आणि शत्रू सैन्याला त्या बिकट जागी आणून त्याचा फडशा पाडणे, शत्रूची रसद तोडणे, शत्रूच्या छावणीच्या आसपासचे पाणी विषारी करणे, आसपासचा प्रदेश वैराण करणे ह्या आणि इतर गोष्टी मराठ्यांच्या गनिमी काव्यात मोडतात. अशा शेकडो गनिमी काव्याच्या लढाया मराठे खेळले. प्रदेशाचे भौगोलिक ज्ञान, काटकपणा, साधेपणा,जनतेची सहानुभूती ह्या गनिमी काव्याच्या यशासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मराठ्यांकडे होत्या. मोगलांकडे त्या नव्हत्या. मल्हाररामरावाने या गनिमी काव्याचे सुंदर वर्णन केलेले आहे, "आपले सैन्य थोडे. यास्तव मनुष्य राखून ...

कर्तव्यप्रिय ताराबाई !!

Image
मुघलमर्दिनी ताराबाई किंवा ताराराणी ह्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांची कन्या व राजाराम महाराज यांच्या पत्नी होय. औरंगजेब नावाचे वादळ हे १६८१ साली स्वराज्यावर चालून आले, तेव्हा मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला. त्या औरंग्यास संभाजीराजे यांनी योग्यप्रकारे उत्तर दिले पण कपटाने संभाजीराजास पकडून त्यांची हत्या औरंगजेबाने केली. त्यानंतर ह्या लढ्याची जबाबदारी येऊन पडली राजाराम महाराजांवर, त्यांनी हरप्रकारे मुघलांना तोंड दिले आणि सळो की पळो करून सोडले. पण दुर्दैव! राजाराम महाराजांचे २ मार्च, १७०० रोजी सिंहगडावर निधन झाले, आणि ह्या हिमालयासारख्या संकटाचे नेतृत्व ताराबाई यांनी केले. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्य चालाविण्याची जबाबदारी ताराबाईंवर येउन पडली. आपल्या पतीच्या हयातीतच ह्या स्त्रीने राज्यकारभारात व लष्करी मोहिमात भाग घेण्यास सुरुवात केली होती. मोगली इतिहासकार खाफीखान म्हणतो, "ताराबाई ही राजारामाची बायको होय. ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार याबाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा फार मोठा लौकिक होता." ताराबाईं...