Posts

Showing posts from February, 2017

**आलिया भोगासी(बिचारा फिलिप गिफोर्ड)**

Image
सदर चित्र हे कोणाशीही संबंधित नसून त्या काळातला इंग्रजी अधिकारी कसा असू शकतो हे दाखवण्यासाठी दिले आहे. शके १५८१ मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमीस म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी राजांनी अफझलखानास यमसदनी पाठविले.त्यानंतर महाराजांनी आदिलशाहीशी युद्धाची आघाडी उघडली.ते स्वतः आपले मुख्य सैन्य बरोबर घेऊन सह्याद्रीच्या पूर्वेचा म्हणजे देशावरचा विजापुरी मुलुख काबीज करीत निघाले,त्याच समयी काही सैन्य कोकणात धुमाकूळ घालून आदिलशाही मुलुख जिंकून घेऊ लागले.मराठी सैन्य कोकणात घुसल्यावर आदिलशाही सैन्याची पुरती दाणादाण उडाली.विजापुरी अधिकारी आपापल्या जागा सोडून राजापूरकडे पळत सुटले.त्यावेळी राजापूर बंदर आदिलशाहीच्या ताब्यात होते व तिथे रुस्तुमजमा नावाचा अधिकारी तिथला कारभार पाहत असे.ह्या रुस्तुम-इ-जमानचा महाराजांनी कोल्हापूरजवळ २८ डिसेंबर १६५९ रोजी पराभव केला होता.राजापूर ही एक मोठी बाजारपेठ होती.आयात-निर्यातीचे केंद्र असल्यामुळे राजापूर श्रीमंत शहर होते. इ.स.१६५८ च्या उत्तरार्धात इंग्रजांनी तिथे एक वखार उघडलेली होती. दोरोजी(धोरोजी) नावाच्या मराठी सरदाराने कोकणात जोरदार मुसंडी मारली होती....

***महाराजांना_फसवलं***

लेखाचा मथळा बघून वाटेल असं का लिहिलंय पण समाजात जे दिसतंय त्यावरून असं लिहिलंय.त्यामुळे कृपया गैरसमज नसावा. शिवाजी महाराजांचा जन्म शालिवाहन शके १५५१,फाल्गुन मास, शिशिर ऋतू,हस्त नक्षत्र वद्य तृतीया म्हणजेच १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी झाला. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. जर शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता तर काय झाले असते?ह्या प्रश्नाला अनेक लोक वेगवेगळी उत्तरं देतील. पण माझा विचारण्याचा उद्देश थोडा वेगळा आहे.इतक्या मोठ्या visionary माणसाचा आपल्याकडे जन्म झाला पण त्याला आपण योग्य न्याय देऊ शकलो का? महाराजांना आपण अनेक विशेषणे लावतो.पण आपण महाराजांना लावू तितकी विशेषणं कमीच आहेत कारण त्यांचा पराक्रम कितीतरी पटीने मोठा आहे.शिवाजी महाराज हे आपल्या सगळयांचे गोत्र आहे.आपल्याकडे लोक शिवाजी महाराजांचे मोठे भक्त म्हणून मिरवत असतात.गळ्यात लॉकेट,हातात कडे तसेच टॅटू पण काढतात.ह्यावरून तुमचे महाराजांवरचे प्रेम सिद्ध होते का?महाराजांचा उदोउदो करणारे अनेक लोक आहेत.डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या महाराजांना आपण डोक्यात कधी घेणार? मुळात इतिहास हा विषय संदर्भासहित अभ्यास करण...

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**

Image
सदर चित्र बाळाजी विश्वनाथ पेशवे पुस्तकातून साभार (थोड्या दिवसांपूर्वी आलेल्या पेशवा बाजीराव ह्या कार्यक्रमात राधाबाईंचे व्यक्तिमत्व दाखवलेच आहे,पण cinematic liberty च्या नावाखाली बऱ्याच गोष्टी चुकीच्या दाखवल्या जातात.कादंबरी,सिनेमे,कार्यक्रम ह्यातून दाखवला जाणारा इतिहास पूर्णपणे बरोबर असतो असे म्हणता येत नाही.इतिहास हा पुराव्यांवर अवलंबून असतो,त्यामुळे त्याचा अभ्यास करणे गरजेचे!) कोकणातील गणपतीपुळ्याच्या आग्नेयेला असलेले नेवरे हे राधाबाईंचे माहेरचे गाव होय.त्यांचे वडील दादाजी जोगदेव बर्वे हे सावकार होते.राधाबाईंचा जन्म कधी झाला याचे साल उपलब्ध नाही.त्यांना मल्हारपंत व त्र्यंबकपंत नावाचे दोन थोरले भाऊ होते.राधाबाईंना चांगले लिहिता वाचता येत होते ह्या गोष्टीला भरपूर आधार आहे.त्यांचे हस्ताक्षर जुन्या वळणाचे बाळबोध पद्धतीचे असावे.त्यांचा विवाह श्रीवर्धनच्या भट घराण्यातील बाळाजी विश्वनाथ भट यांच्याशी झाला.लग्नावेळी बाळाजी हे १२-१३ वर्षांचे व राधाबाई ह्या ६-७ वर्षांच्या असाव्यात असा तर्क आहे.त्यांचा विवाह नेवरे येथे झाला असावा.हे लग्न २० रु. झाले अशी ख्याती आहे.राधाबाईंना थोरले बाजीर...