Posts

इतिहासातील चमत्कारिक नोंदी

Image
इतिहास म्हणजे राजकारण व लढाया हा निव्वळ गैरसमज ! कागदपत्रांतून नव्या गोष्टींचा उलगडा होत जातो. इतिहासाचा अभ्यास करताना कागदपत्रात विविध नोंदी मिळतात. त्या बरच काही शिकवतात, वेगळा दृष्टीकोन देतात, कधीकधी हसवतात देखील. आता आपण काही नोंदी पाहणार आहोत. त्याकाळातील लोकांस काही वेगळेपण जाणवले, म्हणून त्यांनी ते लिहिले असावे. ह्या नोंदी चमत्कारिकच आहेत. आजच्या काळात सुद्धा एखादी विलक्षण गोष्ट आपल्या कानी पडली, किंवा आपण पहिली तर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. काही नोंदी पुढीलप्रमाणे:- फाल्गुन वा|| २ मौणे दोडज तालुके निरथडी येथे वोढ्यात करंगलीएवढा रक्ताचा झरा चार घटका वाहिला म्हणून गांवकरी यांनी रा. नारो अप्पाजी(तुळशीबागवाले) जिल्हेदार यास अर्जदस्त पाठविली. (सदर नोंद १७६० सालची आहे) पुरंदर घेतला आणि निळकंठ महादेव तेथे(सासवडास) गेले होते. तेव्हा गांवजवळ संगमेश्वर देव आहे. तेथील नदीमध्ये विहीरा होता. त्यातील झऱ्यास रक्त येऊ लागले. ते समयी हे स्वतः गेले आणि त्यात अंगवस्त्र टाकिले. ते भिजले तो रक्ताप्रमाणे पाणी! ऐसे तीन दिवस होत होते.  करमाळे तालुक्यापैकी टेंभुर्णी येथे...

पोर्तुगीजांनी(Inquisition) केलेला हिंदूंचा छळ व अन्याय

Image
सदर लेखात आपण पोर्तुगीजांनी(इंक्विझीशनने) हिंदूंचा छळ कशाप्रकारे केला ह्याबद्दल थोडी माहिती देत आहे. ह्यात इंक्विझीशन हा शब्द वारंवार आला आहे. The Inquisition may be described as an ecclesiastical tribunal for the suppression of heresy and punishment of heretics. पोर्तुगीजांनी हिंदूंचा वसई व गोवा येथे मोठ्याप्रमाणावर छळ केल्याची अनेक वर्णने आहेत. पोर्तुगीजांच्या अमलाखालील गोव्याच्या जुन्या काबेजादीतील तिसवाडी , साष्ट व बारदेश ह्या प्रदेशांप्रमाणे वसई प्रांताचेहि ख्रिस्तीकरण एकाच तत्वावर झाले. ते तत्व म्हणजे “ Cuius regio, illius religio” (ज्याचे राज्य, त्याचा धर्म) हे होय. पोर्तुगीज अमलातील लोकांसाठी ख्रिस्ती धर्म प्रसारार्थ वेळोवेळी कायदे करण्यात आले होते. वास्तविकरीत्या अशा तऱ्हेचे कित्येक कायदे पोर्तुगाल येथे ज्यू व मुसलमान लोकांसाठी फार वर्षापासून प्रचलित होते. गोव्यापेक्षाही वसई प्रांतामध्ये हिंदु लोकांस विशेष तीव्रतेने धर्मछळ सोसावा लागला असावा. त्या प्रांतातील वतनदारांस आपापल्या गावातील हिंदु जनतेमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी केलेल्या प्रयत्नाचा अहवाल सरका...

रघुजी भोसल्यांच्या शिक्क्याची गोष्ट

Image
#ऐतिहासिक_सत्यकथा #भाग_२ नागपूरकर भोसल्यांचा इतिहासही दैदिप्यमान आहे. त्यांच्या इतिहासात जे पुरुष नावारूपाला आले , त्यापैकी एक म्हणजे पहिले रघुजी भोसले होय. सेनासाहेबसुभा परसोजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र कान्होजी भोसले यांस सेनासाहेबसुभ्याची वस्त्रे मिळाली. त्यानंतर वऱ्हाडात भाम याठिकाणी त्यांनी आपले स्थान बळकट केले. सुरुवातीस कान्होजी यांस संतति नसल्याने त्यांनी आपल्या चुलत बंधूंचे सुपुत्र रघोजी(पहिले) उर्फ बाबासाहेब यांस आपल्याजवळ ठेविले होते. पुढे कान्होजीस रायाजी नामक पुत्र झाल्यावर त्यांचे रघुजीवरील प्रेम कमी होत गेले. त्यांच्यात बेबनाव होऊन रघुजी चांदसुलतान गोंड राजे यांच्याकडे चाकरीला राहिले होते. नंतर फत्तेसिंग भोसले, रघुनाथभट पटवर्धन इ. मंडळींनी साताऱ्यात शाहू राजांकडे रघुजींसाठी शब्द टाकला होता. पुढे ते फत्तेसिंग भोसले यांच्याबरोबर कर्नाटक स्वारीवर गेले होते.त्यांनी कर्नाटक प्रांती जाऊन स्वपराक्रम व जवमर्दी करून प्रांत सर केला. पुढे कान्होजी भोसले यांनी वऱ्हाड प्रांती बदफैलीवर जुलूम करून महाराजाशी बागी(बंडखोर) झाले. सबब त्यांचे पारिपत्या...

** कुणबिणी किंवा बटिकी**

Image
#भाग_१ जगाच्या पाठीवरील जवळजवळ सर्व प्राचीन संस्कृतीत ‘गुलामगिरी अथवा दास्यत्वाची’ पद्धती आढळते. मध्ययुगातही ती मोठ्या प्रमाणावर चालू राहिली. युरोप-आफ्रिका खंडातही अशा लोकांना विकलेली अनेक उदाहरणे सापडतात. तशा जाहिराती सुद्धा आढळतात. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात देखील ही गोष्ट राजरोसपणे चालत होती. महाराष्ट्रात सुद्धा पुरुष गुलामांपेक्षा स्त्री गुलामांची संख्या मोठी होती. ‘कुणबी ’ हा शब्द व्यवसायवाचक आहे. हा शब्द जातीवाचक सुद्धा आहे. मराठी कागदपत्रात कुणबीण हा शब्द ‘स्त्री-गुलाम ’ या अर्थाने येतो. तत्कालीन लोक दासींना कुणबिणी किंवा बटिकी म्हणत. श्रीमंत , सरदार , राजेरजवाडे व सुखवस्तू लोक आपल्या पदरी कुणबिणी व बटकी बाळगीत. पुरुष गुलामांना ‘पोरगे’ म्हणत व त्यांचा जन्म स्त्री गुलाम म्हणजे कुणबिणींच्या पोटीच झालेला असे. असे पोरगे आपल्या आईबरोबरच विकले जात. कुणबिणी व बटिकी विकणे हा हेडे , चारण इ. लोकांचा धंदा होता. कुणबिणी/बटिकी संबंधी येणारी माहिती:- “लढाईत कोणी पुरुषास धरीत नाहीत व गावगाना लुटीचे समईही कोणी पुरुषास धरीत नाहीत. गावगाना लुटीचे समई बायकास अगर मुलीस ...

शाहू महाराज स्वदेशी दाखल व बापुजी सोनाजी दिघे यांची कामगिरी

Image
#जुन्या_ऐतिहासिक_गोष्टी राजाराम महाराजांनी रामचंद्रपंत यांस हुकूमतपन्हा हे पद दिले होते. त्यावेळी महाराजांच्या आज्ञेवरून मावळ प्रांतीचे सरदार, देशमुख, देशपांडे, जमीनदार आपले जमावानिसी रामचंद्रपंत हुकूमतपन्हा यांचे लष्करात सामील होऊन मोठमोठे पराक्रम करीत होते. रामचंद्रपंतांच्या लष्करात शंकराजी नारायण गांडेकर हे फार हुशार कारकून होते. त्यांनी मावळातील सरदार व फौजेनिशी मुघलांनी जिंकलेले किल्ले, मुलुख काबीज केले. हे वर्तमान रामचंद्रपंतांनी जिंजीस लिहून पाठविल्यावर, राजाराम  महाराजांनी शंकराजी नारायण यांना सचिवपदाचा अधिकार देऊन वस्त्रे पाठविली. शंकराजी नारायण सचिव यांचे फौजेत मुठेखोरे महालचे दिघे देशपांडे मंडळीतील चौघे सरदार होते. याविषयी इसवी सन १६९८ सालचे एक पत्र आहे.१ (इतिहाससंग्रह)                                श्री      “म|| अनाम देशकुलकर्णी तर्फ मुठेखोरे यांसी:- शंकराजी नारायण सचिव सुरुसन तिस्सा तिसैन अलफ, बद्दल शेरणी हक्कापैकी बद्दल देणे वेतनात कारकून व लोक ...

राजाराम महाराजांचा कुटुंबकबिला जिंजीत [चंदी] दाखल

Image
राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास अत्यंत खडतर होता व त्यात त्यांच्या जीवासही बराच धोका होता. महाराज या प्रवासास निघाले तेव्हा त्यांनी त्यांचा कुटुंबकबिला मागे विशाळगडावर ठेवला होता. विशाळगडाहून जिंजीस जाणे आणि स्त्रियांनी प्रवास करणे, ते सुद्धा गुप्तपणे, ६०० मैलांचा प्रवास ही अतिशय कठीण गोष्ट होती.१ रामचंद्रपंतांनाही राण्यांना महाराजांकडे कसे पोहचवायचे असा प्रश्न पडला होता. तो सोडविण्यासाठी विशाळगडाहून काही विश्वासू माणसे त्यांनी जिंजीकडे पाठविली आणि राण्यांच्या प्रवासाची एक योजना महाराजांना कळविली.२ त्यांना सुखरूपपणे जिंजीकडे आणण्याची जबाबदारी राजाराम महाराजांनी लिंगो शंकर तुंगारे व विसाजी शंकर तुंगारे ह्या सावकारी पेशाच्या गृहस्थांवर सोपविली. हे दोघे बंधू म्हणजे खंडो बल्ल्लाळ चिटणीस यांचे मामा असून, त्यांची तारवे किनारपट्टीवर व्यापारी मालाची ने-आण करत असत.३ खंडो बाल्लाळांचे दोघेही मामा राजापूर येथे राहून सावकारी करीत होते. दोघेहीजण विश्वासू आहेत असे पाहून रामचंद्रपंतांनी ठरवले की महाराणी ताराबाई, राजसबाई वगैरे राजघराण्यातील लोकांनी त्यांच्या मदतीने प्रथम समुद्रामार्गे होन...